Ad will apear here
Next
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
प्रातिनिधिक फोटोपंढरपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले जात आहे. 

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. बुधवारी, १७ मे रोजी या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यात या विद्यालयातील पाचवीतील सहा व आठवीतील तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रविराज हनुमंत रोकडे (२१२), संध्या सत्यवान माने (१७२), अस्मिता अनिल सरवदे (१६०), शिवम सिद्धेश्वर पाटील (१५४), ऋतुजा रामचंद्र कोरके (१४४) आणि साहिल मोहन काळे (१२८) हे पाचवीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. (कंसात त्यांचे गुण) आठवीतील ओम बाळासाहेब आदमिले, विनायक सदाशिव गोडसे आणि कांचन चंद्रकांत सांगोलकर हे तीन विद्यार्थी समान, म्हणजेच १७४ गुण मिळवून पात्र ठरले. 

पात्र विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. एम. बागल, पर्यवेक्षक टी. बी. ताटे, विभागप्रमुख सोमनाथ जगताप, उपविभागप्रमुख एन. जी. वाघमारे, गुरुकुल प्रमुख संतोष रोकडे, टी. टी. ननवरे, पी. टी. ताटे, व्ही. एम. रेडे, सी. एस. मलपे, व्ही. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, सरपंच दिनकर कदम, उपसरपंच गणेश भोसले, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी व नारायण गायकवाड आदींसह भूमी अभिलेख उपअधीक्षक शिवाजी भोसले यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZFBBC
Similar Posts
‘आम्ही संपात आहोत; पण शेतीमालाची नासाडी पटत नाही’ पंढरपूर : संप किंवा बंद म्हटले, की खळ्ळ-खटॅक ठरलेलेच; मात्र सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावात कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस पार पडला. हे शेतकरी संपात सहभागी असले, तरी होता होईल तो शेतीमालाची नासाडी करायची नाही, असा सारासार विचार त्यांनी केला आहे
...आणि खारट ऊस गोड झाला पंढरपूर : माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थातच शेतीच्या शाश्वततेला महत्त्व आहे. विविध कारणांमुळे आज मातीची सुपीकता घटत चालली असून, अनेक ठिकाणी वाळवंटीकरण होऊ लागले आहे. हा चिंतेचा विषय बनला असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुरूम व गाळमातीचा वापर करून जमीन सुपीक बनवली आहे. वाळवंटीकरणाबद्दलची
सरड्याची धाव पाण्यापर्यंत... पंढरपूर : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते मात्र सरिसृप वर्गातील प्राण्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. परंतु तापमानाचा पारा खूपच चढू लागल्यामुळे चक्क सरड्यालाही तहान लागल्याने त्याने पाण्याकडे धाव घेतल्याचे पंढरपूर परिसरात आढळून आले आहे. प्राणिशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते ही दुर्मीळ घटना आहे
संभाजी महाराजांची जयंती साजरी पंढरपूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ मे रोजी रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीउत्सवात गट-तटाचे राजकारण व जाती-पातीच्या सीमा पार करून सर्व नागरिक एकत्र आले होते. रोपळे गावात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या महापुरुषांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language